मुंबई- अकेला देवेंद्र है क्या करेगा असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर अमृता फडणवीस जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे की देवेंद्र ना कभी अकेला था, ना अब अकेला है, उनके साथ पुरी कायनात है”अशी प्रतिक्रिया भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर अमृता फडणवीस यांनी दिला आहे.
पुण्यात भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने बुधवार पेठ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जे लोक भाजपकडे आले आहेत, ते सध्या महाविकास आघाडी सरकारचं काम बघून आले आहेत. दुसऱ्या मार्गाची गरजच नव्हती, आजचा विजय हा शिवसे नेला धडा नव्हे, तर आता त्यांना यापुढे धडा सुरू होईल.जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मीच बोलत होते आणि आज सर्व जण तेच बोलत आहेत, जे मी बोलत होते. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काम केलं पाहिजे, त्या प्रकारे ते करत नाहीत. फक्त टोमणे मारायचं काम ते करत आहे. असं देखील यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितलं.